Ranbir Kapoor Relationship Tips : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे क्यूट कपल म्हणून त्यांच्या चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. दोघांनाही लोकांचे खूप प्रेम मिळते. दोघांनाही एक छोटी मुलगी आहे, राहा कपूर, तिचा पहिला वाढदिवस काही दिवसांपूर्वीच साजरा झाला. रणबीरने अलीकडेच लग्न आणि पालकत्वाशी संबंधित त्याचे अनेक अनुभव शेअर केले आहेत. रणबीर कपूर, जो त्याच्या आगामी 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, म्हणाला की आलिया भट्टसोबत लग्न आणि नातेसंबंध सोपे नव्हते पण आम्ही दोघे त्यासाठी प्रयत्न करत आहोत.


लग्नानंतर हे काम सोपे नाही...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना 'अनस्टॉपेबल विथ एनबीके' या चॅट शोमध्ये सहभागी झाले होते. जिथे त्याने पत्नी आलिया भट्टसोबतच्या वैवाहिक आयुष्याविषयी मोकळेपणाने चर्चा केली. लग्नानंतरच्या आयुष्याविषयी विचारले असता रणबीर कपूर म्हणाला, “आम्ही गेली 6 वर्षे एकत्र आहोत आणि मला वाटते की नातेसंबंधाच्या पहिल्या वर्षातच लोकांना समजते की, समोरची व्यक्ती त्यांच्यापेक्षा वेगळी आहे आणि तुमच्याशी जुळवून घेणे आवश्यक आहे. नातं टिकवणं सोपं नसतं. समोरच्या व्यक्तीला समजून घेणे अवघड असते, म्हणूनच तुम्हाला त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि त्यांना भावनिकदृष्ट्या समजून घेण्याची गरज देखील प्रत्येक नात्यात असू शकते.


अशा प्रकारे तुम्ही तुमचे वैवाहिक जीवन यशस्वी करू शकता 


रणबीर म्हणतो की, कोणतेही लग्न यशस्वी करण्यासाठी जोडीदारांना खूप मेहनत करावी लागते. लोकांना त्यांचे नाते सुधारण्यासाठी नेहमीच प्रयत्न करावे लागतील आणि सतत काम करावे लागेल.


आलियाशी भांडण्याऐवजी रणबीर करतो हे काम


एक मजेदार अनुभव शेअर करताना रणबीर कपूर म्हणाला की, त्याला त्याच्या सर्व गोष्टी योग्य ठिकाणी ठेवायला आवडतात, तर त्याची पत्नी आलिया भट्ट खूप बेफिकीर राहते. रणबीर कपूरने सांगितले की, आलिया जेव्हा आंघोळ करून येते तेव्हा तिचा टॉवेल इकडे-तिकडे जमिनीवर पडलेला आढळतो. तर रणबीरला हे करायला कधीच आवडत नाही. पण, टॉवेलच्या मुद्द्यावरून आलियाशी भांडण्याऐवजी तो रोज जमिनीवरून टॉवेल उचलतो आणि टबमध्ये ठेवतो. रणबीर म्हणतो की, अशा छोट्या गोष्टीच तुमचे वैवाहिक जीवन यशस्वी करतात.