प्रत्येक बाळाचा जन्म हा खास असतो. ज्या दिवशी गोंडस बाळाचा जन्म होतो तो दिवस त्याच्या कुटुंबियांसाठी देखील अत्यंत महत्त्वाचा असतो. मुलांचं वेगळेपण हे पालकांसाठी अतिशय खास असतं. सप्टेंबर महिन्यात म्हणजे गणेशोत्सवाच्या काळात जन्मलेल्या मुलांमध्ये खास गुण असतात. हे गुण मुलांना इतरांपेक्षा वेगळे ठरवतात. ते गुण कोणते ते समजून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर हा गणेशोत्सवाचा सण असणार आहे. या काळात जर घरी बाळाचा जन्म झाला तर तो खास ठरेल. गणेश चतुर्थीच्या काळात जन्मलेल्या मुलाचं वेगळेपण काय, समजून घ्या. 


यश गाठतात 
सप्टेंबर महिन्यात जन्मलेलं मुलं अतिशय वेगळं असतं. ही मुलं यशाला आपल्यासोबतच जन्माला घेऊन येतात. कारण ही मुलं भविष्यात जे काही काम करतात. त्यामध्ये त्यांना यश सहज मिळून जातं. सप्टेंबर महिन्यात जन्मलेली मुलं यशाच्या शिखरावर पोहोचतात. त्यांची मेहनत आणि पुण्य या सगळ्याच गोष्टी कारणीभूत ठरतात. 


स्वभाव 
ज्या मुलांचा जन्म सप्टेंबर महिन्यात झालेला असतो. ती मुलं अतिशय वेगळी असतात. या मुलांचा स्वभाव अतिशय मनोकळा असतो. विचार करुन बोलणाऱ्या मुलांपैकी हे मुलं समजले जाते. जीवनात कोणताही निर्णय ही मुलं अतिशय विचार करुन घेतात. या मुलांच्या स्वभावामुळे अनेकांना याचा फायदा होतो. 


आशावादी 
जीवनात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलांची एक खास गोष्ट म्हणजे ते बुद्धिमान लोक बनतात आणि त्यांची आशावादी विचारसरणी असतात. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलांना विशेष मानले जाते. आशावादी असलेल्या या मुलांकडून बरंच काही शिकण्यासारखं असतं. 


संकटांपासून कायम दूर 
सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलांची एक खास गोष्ट म्हणजे त्यांना त्रासापासून दूर राहण्याची सवय. काही लोक पुन्हा पुन्हा अडचणीत येतात, तर सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलांना त्रासांपासून दूर राहण्याची सवय असते. ही मुलं कायमच संकटापासून दूर राहतात. सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलांचं पुण्य याबाबतीत सर्वाधिक असतं. 


मजेशीर 
जर तुमच्या मुलाचा जन्म सप्टेंबर महिन्यात झाला असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की भविष्यात ते एक मजेदार व्यक्तिमत्त्व असलेले व्यक्ती बनू शकतात. ते सर्वांशी विनोद करतात आणि त्यांच्या या शैलीने ते सर्वांची मनं जिंकतात.जीवनातील खडतर प्रवास ते अगदी आनंदाने जगतात. असं जगता येणं आजच्या काळात अतिशय महत्त्वाचं आहे.