मुंबई : उपनगरातील ठाणे आणि कल्याण येथील काही पर्यटक कोकणात सहलीसाठी गेले होते. मालवण देवबाग येथे नौका विहार करीत होते. यावेळी सोसाट्याचा वारा आणि जोरदार लाटा उसळल्याने नौका कलंडली आणि नऊ पर्यटक समुद्रात फेकले गेलेत. यात पाच महिला, तीन लहान मुले आणि एक पुरुष यांचा समावेश होता. या दुर्घटनेत माया आनंद माने या वृद्ध महिलाचा मृत्यू झाला. अन्य आठ जणांना समुद्रातून बाहेर काढून वाचविण्यात यश आले आहे. यातील दोन महिला आणि एका मुलावर उपचार करण्यात आलेत. सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालवण तालुक्यातील देवबाग संगम खाडीपात्रात नौकाविहार करताना जोरदार वारा आल्याने नौका कलंडून नौकेतील सगळे पर्यटक पाण्यात फेकले गेले.   कोकण किनारपट्टीवर वादळाचा इशारा देण्यात आला होता. तरीही नौका समुद्रात घालण्यात आी होती. किनारपट्टी आणि खाडीपट्ट्यात तुफान वारा वाहत आहे. त्याचाच फटका पर्यटकांच्या नौकेला बसला.


ठाणे - कल्याण येथील पर्यटकांचा ग्रुप देवबाग येथे आला होता. आज दुपारी नौकाविहार करत असतानाच साडेबारा वाजताच्या सुमारास ही पर्यटक नौका जोरदार वाऱ्यामुळे एका बाजूला कलंडली आणि ही दुर्घटना घडली. नौकेतील पर्यटक  फेकले गेल्याचे समजताच स्थानिक मच्छिमारांनी प्रसंगावधान दाखवत पाण्यात बुडालेल्या सर्व पर्यटकांना बाहेर काढले. या सर्वांना तातडीने मालवणमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे उपचारापूर्वीच कल्याणमधील माया माने या वृद्धेचा मृत्यू झाला. तर तीन वर्षांची अनया अमित अडसुळे (बदलापूर) ही चिमुकली गंभीररित्या जखमी झाली.