चंद्रपूर : कार्तिकी पौर्णिमेनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातल्या पांढरकवडामध्ये 25 हजार दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचमुखी हनुमान मंदिरात देव दिवाळीचं उत्साहात साजरी करण्यात आली. तीन वर्षांपासून इथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. 


या निमित्त राम जानवी विवाहाचंही आयोजन करण्यात आलं होतं. वऱ्हाडी मंडळींनी यावेऴी दिवे लावून रोषणाई केली. या कार्यक्रमासाठी चंद्रपूर, वणी, घुग्गुस परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. 


विद्युत रोषणाई पाहण्याची सवय झालेल्या डोळ्यांना 25 हजार दिव्यांची रोषणाई पाहतांना आनंद झाल्याचं सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होतं.