रायगड : रायगड जिल्ह्यातिल धबधबे पर्यटकांसाठी असुरक्षित ठरलेत. कर्जतच्या आशाने धबधब्यावर मुंबईतील वडील आणि मुलगी पाण्याच्या प्रवहात वाहून गेले  होते. प्रकाश बोराडे यांचा मृतदेह सापडलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, 24 तासानंतरही वाहून गेलेली बेपत्ता असलेली १३ वर्षीय तेजस बोराडे ही मुलगी अजुन सपडलेली नाही. तिचा शोध अजूनही सुरु आहे. तर दुसरीकडे आनंदवाड़ी वॉटर फॉलवर एका पर्यटकाचा आणि पेब किल्ल्यावर एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. 


अलिबाग जवळील चौलमध्येही पर्यटकाचा तलावात बुडून मृत्यू झालाय. दोन दिवसात ५ पर्यटकांचा वीकेंड एन्जॉय करताना मृत्यू झाल्यानं वर्षापर्यटन धोक्यात आलंय.