अमरावती : शहराला लागून असलेल्या रहाटगाव रिंगरोडवर टवेरा आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे... या अपघातात अंजनगाव बारी येथील चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतकामध्ये एक महिलेसह लहान मुलीचाही समावेश आहे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघात एवढा भीषण होता की टवेरा कारचा चक्काचूर झाला आहे...तर ट्रकचे पुढील चाक देखील तुटलं...घटनास्थळी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली...



अमरावतीचं नाही तर आज सकाळी जळगावमध्ये  देखील अपघात झाला. अज्ञात वाहनांच्या धडकेत 2 तरुणांचा मृत्यू झालांय.. परवेझ आणि आमीर अशी दोघांची नावं आहेत.. 


दूरदर्शन टॉवरच्या समोरच्या अरूंद रोडवर त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात परवेजचा जागीच मृत्यू झाला..तर आमीरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला..