मुंबई : आजचा शनिवार म्हणजे अपघातवार असाच म्हणाव लागेल. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात अनेकांचे मृत्यू झाले आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूर इथं भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झालाय. मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या इनोव्हा गाडीला हा अपघात झालाय. इनोव्हा चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यानंतर ही इनोव्हा रस्त्याच्या कडेला वाहनांची वाट पाहात असलेल्या प्रवाशांच्या अंगावर गेली. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झालाय. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे.


ट्रकची बसला जोरदार धडक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईहून कर्नाटकात सहलीसाठी गेलेल्या आरामदायी बसला अपघात होऊन सहा जण जागीच ठार झाले. तर पंधरा गंभीर जखमी झाले. कर्नाटकमधील   धारवाड जिल्ह्यातील अन्निगेरी तालुक्यातील कोळेवाड क्रॉसजवळ हा अपघात घडला.


सर्व मृत आणि जखमी मुंबईचे असल्याची प्राथमिक माहिती आहे.


मुंबईची आरामदायी बस हंपी, बदामीसह दक्षिण कर्नाटकात सहलीसाठी गेली होती. ते परतत असताना कोळेवाड क्रॉसजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने बसला जोराची धडक दिल्यानं बस उलटली.


यामध्ये सहाजण जागीच ठार झाले.  मृतांमध्ये विश्वनाथ म्हात्रे,  दिनकर म्हात्रे, रमेश जयमला, सुमेधा जयमाला, लहु किर्लोस्कर आणि सुचित्रा राहुल यांचा समावेश आहे. बसमधील एकूण प्रवाशांपैकी पंधरा जण गंभीर जखमी झाले.


या सर्वांवर हुबळी येथील किम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.