रायगड : राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर त्यांना भेटायला जाण्यासाठी निघालेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कारवर शिवसैनिकांनी दगडफेक केली. त्यानंतर मुंबईत दोन-तीन दिवसांपासून जे काही सुरु आहे त्याला राणा कुटुंबीय जबाबदार आहेत. राणा कुटुंबीय मोदीजींची माकडं आहेत, अशी टीका शिवसेना पदाधिकारी आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे लोक अचानक येतात आणि अचानक बोलतात. आम्ही मातोश्रीत घुसून हनुमान चालीसा म्हणणार, अशी त्यांची विधानंही चुकीची आहेत. तुम्हाला करायला मनाई नव्हती. तुम्ही प्रेमानं या मंदिरांमध्ये येऊन हे करा. पण, हा विचित्र खेळ सुरु असल्याचं दिसतंय असे त्या म्हणाल्या.


राणा दाम्पत्य यांना भेटायला जाणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यावेळची परिस्थितीच तशी होती. जो नडला, त्याला फोडला ही बाळासाहेबांची शिकवण आहे आणि हे तर बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, असा हल्ला त्यांनी चढविला.


जर त्या गाडीमध्ये सोमय्या यांच्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी असते तरी ती शिवसैनिकांनी फोडली असती, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. राज्यात राष्ट्रवादीच्या संकल्प सभा सुरु आहेत. यामधून विरोधकांना उत्तर देण्यात येत आहेत. पण, आता तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महासभा घेत विरोधकांना उत्तर द्यावं, तेव्हाच या सर्व गोष्टी थांबतील, असेही त्या म्हणाल्या.