रायगड : कोरेगाव भीमा प्रकरणी बाहेरच्या शक्ती कोण आहेत? हे सरकारने शोधून काढलं पाहिजे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस काय झोपा काढत होते? असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलाय. मंत्री काय करतात? त्यांचा कुणावर वचकच राहिला नाही. हे काही एका दिवसात घडलेलं नाही, असंही त्यांनी म्हटलंय.


या संदर्भात लोकसभा आणि राज्यसभेत मुद्दा उपस्थित केला गेला. उभ्या भारत देशाने त्याची नोंद घेतली तरीही त्यावर पंतप्रधान बोलायला तयार नाहीत, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. 


रायगड जिल्हयातील माणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. 


काय म्हणालेत अजित पवार... ऐका त्यांच्याच तोंडून...