अहमदनगर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव येथे येऊन आंदोलनकर्ते शेतकऱ्यांची भेट घेतली. पोलिसांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत विचारपूस केली. 


जबाबदार असण्याऱ्यांवर कारवाई करा - अजित पवार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे सरकार शेतकऱ्यांविरोधी भूमिका घेत असून शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यापर्यंत त्यांची मजल गेली असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. तर या घटनेला जबाबदार असण्याऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. 


गोळ्या घालून प्रश्न सुटत नाही - अण्णा हजारे


तर दुसरीकडे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही जखमी झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली. कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांवर हल्ले होत असतील, तर ही काळीमा फासणारी गोष्ट असल्याची खंत अण्णा हजारे यांनी यावेळी व्यक्त केली. चर्चेने प्रश्न सुटतात गोळ्या घालून नाही अशी टीकाही अण्णांनी केली.