अहमदनगर :  राज्य सरकारमध्ये राहून शिवसेनेची बँकासमोर ढोल वाजवण्याची घोषणा म्हणजे निव्वळ ढोंगीपणा आहे, असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 शेतकऱ्यांसाठी मदतच करायची असेल तर मंत्र्यालयात किंवा वर्षा बंगल्यासमोर ढोल वाजवा, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्या निमित्ताने आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. 


कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन पवार काका पुतण्यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. अहमदनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजीत पवार यांनी पावसाळी अधिवेशनात सरकारला पहिल्याच दिवशी जाब विचारणार असल्याचे म्हटलंय. तर फलटण येथे शरद पवार याना श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला सत्कारावेळी पवार यांनी कर्जमाफी आणि शेतक-यांच्या मुद्द्यावरुन फडणवीस सरकारवर टीका केलीय. 


कर्जमाफीत राजकारण नको वास्तवतेचे निर्णय झाले नाहीत तर सत्ताधाऱ्यांना शेतकरी सरसकट धक्का दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा मुख्यमंत्र्याना  इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यानी फलटण येथे बोलताना दिला.