मुंबई : कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटचा वाढता धोका लक्षात घेऊन मुंबईत १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आणि कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनांचा एक भाग म्हणून शहरात मोठ्या मेळाव्यावर बंदी लागू राहील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत ३१ डिसेंबर पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आली आहे. केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच दुकाने, आस्थापना आणि सर्व सार्वजनिक वाहतुकीत प्रवेश करण्याची परवानगी आहे. याशिवाय कोणताही कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच समाविष्ट करण्यास सांगितले आहे.


दोन दिवसांपूर्वी 31 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नवी नियमावली जारी केली होती. त्यानुसार मुंबईत नवी नियमावली लागू झाली आहे. मुंबईतील मॉल, हॉटेल, दुकानांमध्ये पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. सार्वजनिक कार्यक्रमात केवळ 50 टक्के उपस्थितीची अट लागू करण्यात आली आहे. तसेच मॉल, दुकाने, सार्वजनिक वाहतूक इथे केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. 



थर्टी फर्स्टच्या पाटर्य़ांवर पालिकेचा वॉच असणार आहे. 100 भरारी पथकं यासाठी नेमण्यात आली आहेत.  प्रत्येक वॉर्डात 2 ते 5 भरारी पथकं नेमून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, हॉल, पब, पाटर्य़ांच्या ठिकाणी पालिकेचे अधिकारी पोलिसांसह सरप्राइज व्हिजिट करणार आहेत. यावेळी मास्क न घातल्यास, गर्दी आढळल्यास रोख दंड किंवा साथरोग कायद्यानुसार कारवाई करणार आहेत.