धर्माबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना धर्माबाद न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय. नायडू यांच्या विरोधात काढलेले अटक वारंट न्यायालयाने रद्द केले आहे. पुढील सुनावणीला हजर न राहण्याची मुभाही दिलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2010 साली बाभळी बंधारा आंदोलन दरम्यानचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. न्यायालयीन कोठडीत असतांना तुरुंगअधिकारी आणि पोलिसांना मारहाण करणे आणि धक्काबुक्की ,शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल होता.


चंद्राबाबूंसह 16 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. चंद्राबाबू नायडू हे एकाही सुनावणीला न्यायालयात हजर न राहिल्याने अटक वारंट काढण्यात आले होते.