सांगली : सांगलीतील कारंदवाड़ी गावात तीन तरुणांवर आणि दोन महिलांवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

10 ते 15 जणांच्या टोळी ने हा हल्ला केला. त्याचप्रमाणे घरातही त्यांनी तोडफोड केली. या हल्लेखोरांनी तलवार, कोयता आणि काठ्यानं जबर मारहाण केलीय. 


या तिघांच्या डोक्याला जबर मार लागलाय. तर एकाचं बोट तोडलंय. आणि महिलांनाही जबर मारहाण केलीय. हॉटेलमध्ये जेवणाची उधारी मागितल्याचा राग मनात धरुन मारहाण केलीय.