वसई :  लहान मुलांचं अपहरण करुन विक्री करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा ठाणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यात १६ वर्षीय मुलीचा समावेश आहे. या प्रकरणात मुंबईतील मालाडमध्ये अपहरण झालेल्या १६ वर्षीय तरुणीची सुटका करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालाडमधल्या मालवणीतील अनुराधा हॉस्पिटलमधून २००१ मध्ये, अवघ्या १० ते २० दिवसांच्या बाळाची चोरी करण्यात आली होती.


मिरा रोड मध्ये राहणाऱ्या आणि व्यवसायाने बारबाला असलेल्या किरण राजनं आपली मयत बहिण सुषमा सिंग आणि मालाडच्या मालवणी येथील अनुराधा हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका दायीच्या मदतीने मूल हॉस्पिटलमधून आणलं होतं. मात्र १६ वर्षांनंतर किरण हे बाळ चोरीचं प्रकरण उघड झालं, ती तिला वाममार्गाला लावण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती आहे.


२ महिलांसह ५ जणांना पोलिसांनी बेडया ठोकल्या होत्या. याच टोळीच्या तपासात मिरा रोडमधील एका महिलेकडे १६ वर्षांची मुलगी सापडली. तिच्या आई-वडिलांचा शोध सुरू आहे.


कोणाचं बाळ अनुराधा हॉस्पिटलमधून २००१ साली हरवलं असेल, तर त्यांनी तातडीनं ठाणे ग्रामीण पोलिसांशी संपर्क करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.