औरंगाबाद : शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी मला आयुष्यातुन उठवण्याचा विडा उचलला होता.. मात्र त्यांच्या मुलाला आमदार करायचं म्हणून कदमांनी कर्यालयात येऊन दिलगिरी व्यक्त केल्याचं गुपित केंद्रीय मंत्री  आणि शिवसेना खासदार अनंत गिते यांनी उघड केलंय.. माझ्यावर आलेली वेळ कुणा शिवसैनिकावर येऊ असं काम करण्याचं आवाहन गिते यांनी यावेळी केलं. ते औरंगाबादमध्ये शिवसेना शाखा वर्धापन कार्यक्रमात बोलत होते. लोकसभा निवडणुकीत मी कमी मताने निवडून आलो. माझी पीछेहाट का झाली तर मी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि शेतकरी कामगार पक्षाविरोधात लढलो. इतकंच नाही, तर स्वकियांसोबत म्हणजेच रामदास कदम यांच्यासोबतही लढलो. त्यांनी मला पाडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मी विजयी झालो असंही यावेळी गितेंनी सांगितलं.