औरंगाबाद : नागरिकांच्या बोथट होत चाललेल्या संवेदनांचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. चोर असल्याच्या संशयावरुन औरंगाबादमध्ये ९ जणांना जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत २ जणांचा मृत्यू झालाय. औरंगाबादमधल्या वैजापूर तालुक्यातली ही घटना आहे. नारळा-पारळा, रोटेगाव आणि आघुर गावातील ग्रामस्थांनी ही मारहाण केली. जखमींवर वैजापूर आणि औरंगाबादमधल्या घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मारहाण झालेले खरंच चोर होते की कामगार याचा शोध पोलीस घेत आहेत.