मुंबई : तीन अंकी नाटकाचा शेवट त्यांना माहीत नाही, म्हणून भाजप नेते बोलत असल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावलाय. तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आमचे मित्र आहेत, पण क्रिकेट आणि राजकारणात फरक आहे, क्रिकेटमध्ये बॉल दिसत असतो, पण भाजपला बॉल दिसला नसल्याचाही टोला त्यांनी लगावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांआधीच आम्ही राज्यपालांना भेटून अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची मदत मिळावी म्हणून विनंती केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तर राज्यात जास्त वेळ थांबावं लागणार नाही, लवकरच सत्ता स्थापन होईल तसंच 
मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्री याबाबत दिल्लीच्या स्तरावर निर्णय होतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.


सध्या राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत चर्चा सुरू आहे, यानंतर शिवसेनेशी चर्चा झाल्यानंतर किमान समान कार्यक्रमाद्वारे बोलणी करून सरकार स्थापन होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. याआधी पुन्हा भाजपानेते नितिन गडकरी यांनी क्रिकेटमध्ये आणि राजकारणात शेवटच्या क्षणी काहीही होवू शकतं असं वक्तव्य केलं आहे.