नागूपर : नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवण्याची मागणी भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या दहा-बारा दिवसाच्या कामकाजातून विदर्भाला न्याय मिळू शकत नाही हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळे हे अधिवेशन किमान ६ आठवड्याचे करावे अन्यथा अधिवेशनाचा फार्स बंद करावा अशी मागणी काटोलचे भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केलीय.


विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होण्याआधी आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले एक पत्र प्रसिद्ध माध्यमात जारी केले होते.


या पत्रामध्ये त्यांनी राज्य सरकार विविध मोर्च्यांवर अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.


भाजप आमदार आशिष देशमुखांची मागणी