अकोला : गोसेखुर्द प्रकल्पाच्या माध्यमातून सरकारनं मत्स्यमाफिया तयार केल्याचा आरोप भाजप खासदार नाना पटोले यांनी राज्य सरकारवर केलाय. ते अकोला येथे 'झी 24 तास'शी बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकार मत्स्यमाफियांना संरक्षण देवून चारसो बीसी करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्री मुंबईत गेल्यावर बदलल्याचा त्यांनी पुनरूच्चार केलाय.


दरम्यान, मी लोकप्रतिनिधी असल्यानं सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोलतच राहणार असल्याचं म्हटलंय. दलाली करणा-यांनी आपल्याला शहाणपण शिकवू नये असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना लगावला.