नागपुर : नांदेड आणि गुरुदासपूरमध्ये काँग्रेसला मिळालेला विजय म्हणजे भाजपचा परतीचा प्रवास असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.  ते आज नागपुरात बोलत होते. 
 


नागपूरात काँग्रेसमध्ये असलेला वाद आणि गटबाजी दुःखद असून,त्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चेला तयार असल्याचंही चव्हाणांनी म्हटलंय. काँग्रेसनं आयोजित केलेल्या यवतमाळमधल्या शेतकरी मोर्चाच्या निमित्तानं अशोक चव्हाण यांचं नागपुरात आगमन झाले. 
यावेळी मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते विमानतळावर उपस्थित होते. नांदेडमधल्या विजयानंतर चव्हाणांचं कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले गेले.