श्रीकांत राऊत, यवतमाळ : यवतमाळच्या आर्णी शहरात प्रेमप्रकरणातून एका युवकाच्या खुनामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. ड्रिमलँड सिटीमध्ये पहाटेच्या सुमारास हा रक्तपात घडला असून अकील शब्बीर खान असे हल्यात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. खून झाल्याचे समजताच काही युवकांनी घटना घडली ते घर पेटवून दिल्याने परिसरात दहशत निर्माण झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृत अकील रात्री मित्राच्या वाढदिवसाची पार्टी सोडून त्याच्या प्रेयसीच्या घरी पोहोचला. याठिकाणी वाद होऊन घरापुढे हाणामारी झाली. यावेळी नितीन कदम, मंदा रामटेके आणि सतीश जमदाडे यांनी धारदार शस्त्राने अकीलवर हल्ला केला. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. घटनेपूर्वी अकीलने आपल्या मित्रांना मोबाईल वरून घटनास्थळी बोलाविले होते. त्यांच्या समक्ष खुनाचा हा थरार घडला.


खून झाल्याचे समजताच काही युवकांनी ड्रिमलँड सिटी येथील घर पेटवून दिली. या आगीत घरातील साहित्य खाक झाले. खुनामुळे तणावाची परिस्थिती बघता पोलिसांनी आर्णी शहरात तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.