प्रफुल्ल पवार, प्रतिनिधी- रायगड : गावी निघालेल्या बसचा रस्त्यात भीषण अपघात झाला आहे.  रायगड जिल्‍हयात माणगाव ते श्रीवर्धन मार्गावर घोणसे घाटात भीषण अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून 20 प्रवासी जखमी आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुंबई नालासोपारा इथून प्रवासी घेवून बोर्ली - श्रीवर्धनकडे निघालेल्‍या खाजगी बसला हा अपघात झाल्याची माहिती मिळाली. 


प्राथमिक माहितीनुसार सकाळी 8.30 च्या सुमारास घोणसे घाटात अवघड वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्‍याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली. 


पोलीस आणि स्‍थानिकांनी मदत कार्य सुरू केले आहे. जखमींना म्‍हसळा येथील उपजिल्‍हा रूग्‍णालयात उपचारासाठी हलवण्‍यात आले आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.