दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यात 15 सप्टेंबरच्या आसपास आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचं विधान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यावर चंद्रकांत  पाटील निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का ? असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात १५ सप्टेंबरच्या आसपास आचारसंहिता लागण्याची शक्यता असून 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान विधानसभा निवडणूक होण्याचा अंदाजही चंद्रकांत पाटील यांनी वर्तवला होता. यावर विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत की मुख्यमंत्र्यांनी त्यांना निवडणूक आयोगात डेप्युटेशनवर पाठवलं आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.



भाजपाचे नेते आकडे जाहीर करतात आणि चंद्रकांत पाटील तारखा जाहीर करत आहेत. यापूर्वी अबकी बार ३०० के पार अशी घोषणा दिली होती. तेव्हा ३३० जागा जिंकल्या. आता राज्यातील नेते अबकी बार २२० के पार अशी घोषणा दिली जातेय. ही माहिती यांना मिळते कशी, निवडणूक आयोग यांना  तारखा सांगते का असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.