Chandrashekar Bawankule On Shivsena Symbol Goes to Eknath Shinde: ठाकरे आणि शिंदे गटातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला आता कुठे पुर्णविराम मिळाला आहे. गेल्या 7 महिन्यांचा हा सत्तासंघर्ष आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना (Maharashtra Sattasangharsh) असे दोन गट पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात सत्तासंघर्ष सुरू झाला आहेत. आता एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण चिन्ह मिळाले आहे. सत्यमेव जयते अशी पहिली प्रतिक्रिया भाजप नेते ंचंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. या निकालानं बहूमताला मान्यता मिळाली आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाला मान्यता मिळाली आहे. जे 13 कोटी जनतेला वाटतेय ते आज सिद्ध झाले आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) पुढे म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी आली आहे. गेले सहा महिने सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात (Maharashtra Politcs) केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) मोठा निर्णय दिला आहे. धनुष्यबाण (Dhanushyaban) आणि शिवसेना (Shivsena) नाव एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) यांच्या गटाला मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना हे नाव निसटलं आहे. 


एकनाथ शिंदे हे चाळीस आमदार घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले आणि सत्तेवर असलेले महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपबरोबर हात मिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला. याबाबत ठाकरे गट आणि शिंदे गटाची कोर्टात आणि निवडणूक आयोगासमोर लढाई सुरु होती. या लढाईत एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली आहे. 


बाळासाहेब ठाकरे यांनी 1968 साली पक्षाची राजकीय संघटना म्हणून नोंद केली होती. डरकाळी फोडणारा वाघ ही सेनेची आधी ओळख होती. पण निवडणूक आयोगाच्या यादीत हे चिन्ह नव्हतं. त्यामुळे त्यांना ते मिळालं नाही. शिवसेनेने पहिल्यांदा ठाणे पालिकेची निवडणूक लढवली होती. तेव्हा शिवसेनेने ढाल तलवार हे चिन्ह घेतलं होतं. 


गेले सहा महिने सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात (Maharashtra Politcs) केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) मोठा निर्णय दिला. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ठाकरे गटाला (Thackeray) मोठा धक्का बसला आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना हे नाव निसटलं आहे.