नागपूर : हल्लाबोल आंदोलन करणाऱ्यांचे डल्लाबोल पुरावे आपल्याकडे आहेत, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सरकारी चहापानानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. विरोधकांची टेप अजूनही सैराटवरच अडकली असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर अधिवेशनात 19 विधेयकं मांडली जाणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. कापूस उत्पादन वाढल्याचा दावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. तसंच बोंड अळीग्रस्तांना नुकसान भरपाई देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.


तर 3 वर्षात गोसीखुर्दचं काम पूर्ण होईल असा दावाही केला. आधारकार्ड जोडणी ही पारदर्शी आणि गतीमान कामासाठीच असल्याचंही ते म्हणाले. 29 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.