नागपूर : राज्यातील ४३ लाख खातेधारक शेतक-यांपैकी २२ लाख ४६ हजार खात्यांमध्ये कर्जमाफीची २० हजार ७३४ कोटी रूपये जमा झालेत, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला. उर्वरित शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी पुस्तीही त्यांनी कर्जमाफीवरच्या चर्चेला उत्तर देताना जोडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात देण्यात आलेल्या कर्जमाफीचा फायदा अनेक बोगस शेतक-यांनी उचलला. त्यावेळी एका आमदारानं आणि त्याच्या कुटुंबातल्या ८ जणांनी कर्जमाफीचा लाभ घेतला, अशी टीका देखील मुख्यमंत्र्यांनी केली. त्यामुळेच यावेळी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले, असा खुलासा त्यांनी केला.