नितेश महाजन, झी मीडिया, जालना : सध्या राज्यात निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वेगवेगळ्या यात्रा काढल्या आहेत. पण या यात्रांना जनतेकडून प्रतिसाद मिळत नसून विरोधकांच्या सभेतील गर्दीने मंगल कार्यालय देखील भरत नसल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


जालना जिल्ह्यातील अंबड येथे भाजपची महाजनादेश यात्रा पोहचली. यावेळी आयोजित सभेत मुख्यमंत्र्यांनी हा टोला हाणला. मुख्यमंत्र्यांच्या सभेला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली. या प्रतिसादाचं कौतुक करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या यात्रांवर निशाणा साधला.