सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : विरोधी पक्षनेत्यांनीच शिर्डीमध्ये मुख्यमंत्र्यांचं गौरवगान सुरू केल्यानं राधाकृष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश करणार की काय, अशी चर्चा सुरू झालीय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे हे कोणत्याही क्षणी काँग्रेसचा हात सोडून कमळात बसतील, अशी शक्यता वर्तवली जातेय. काँग्रेसचे बडे नेते भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्यांमुळं काँग्रेस कार्यकर्त्यांची अस्वस्था आणखी वाढलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण विखे पाटील यांच्या या वक्तव्याबाबत काहीही खुलासा करत नसले तरी राजकीय नेते कधी काय करतील, याचा नेम नाही. आधीच देशात काँग्रेसचं पानिपत झाल्यानं कार्यकर्ते हवालदिल आहेत. त्यात बडे नेते पक्ष सोडण्याच्या बेतात असल्यानं कार्यकर्ते आणखीच गोंधळून गेलेत.