मुंबई : यंदा जून ते सप्टेंबर या काळात हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजापेक्षा कमी पावसाची नोंद झालीय. त्यामुळे देशाच्या काही जिल्ह्यांवर यंदा दुष्काळाचं सावट जाणवण्याची शक्यता आहे. प्रमुख्यानं गुजरात, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पर्जन्यमान चिंताजनक स्थितीत असून महाराष्ट्रातील मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर वरुणराजाची अवकृपा झाल्याचं आकेडवारीतून पुढे आलंय.


अंदाज चुकला 


हवामान खात्यानं यंदा मान्सूनच्या काळात साधारण ९७ टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. पण प्रत्यक्षात सप्टेंबर अखेरीस फक्त ९१ टक्के पावसाची नोंद झालीय. यंदा सलग पाचव्या वर्षी हवामान खात्याचा अंदाज चुकलाय.