पुणे : पुढच्या वर्षी राज्यातलं सरकार बदलणार असल्याचं भाकीत करणाऱ्या गिरीष बापटांनी पाठोपाठ आणखी एक वाद ओढवून घेतलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आताच्या मुली चल म्हटलं कि चालल्या' अशा आशयाचं विधान केल्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका सुरु झालीय. पुण्यातील एका शाळेच्या कार्यक्रमात उपस्थित मुलींसमोर बोलतांना त्यांचा तोल सुटला. स्वामी विवेकानंदांचं मोठेपण सांगणारी गोष्ट सांगत असताना त्यांची जीभ घसरली.



राष्ट्रवादी महिला काँग्रेसनं त्यांच्या बापट यांच्या वक्तव्याचा खास पुणेरी स्टाईल निषेध केलाय. बापट यांची खिल्ली उडवणारे फलक त्यांनी शहरात ठिकठिकाणी लावले होते.