मुंबई :  राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे आकडे विक्रमी नोंद करीत आहेत. नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे, मुंबई आदी शहरांमध्येही कोरोनाने थैमान घातले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात आज नव्याने 30 हजार 535 रुग्णांची नोंद झाली आहे. आजवरची राज्यातील ही सर्वाधिक नोंद आहे. 


राज्यात आज कोरोना संसर्गामुळे 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घालायला सुरूवात केली आहे असे दिसून येत आहे. 


मुंबईत आज दिवसभरात 3 हजार 775 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईत 10 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.