नागपूर: निवडून आल्यावर जनतेच्या प्रश्नाकडे सोईस्कर दुर्लक्ष करणाऱ्या नगरसेवकांना नागपूरकरांनी आज नागपूरी इंगा दाखवला. वॉर्डाकडे नगरसेवक लक्ष देत नसल्याच्या आरोप करत नागपुरातील शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये नगरसेवक हरवल्याची तक्रार दाखल केली. प्रभाग क्रमांक पाचमधल्या समस्या ऐकून घेण्यासाठी नगरसेवक कधीच जागेवर सापडत नसल्याची या नागरिकांची तक्रार आहे. गेल्या वर्षभरात नगरसेवकांनं एकदाही वॉर्डाची पाहणी केलेली नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळेच नगरसेवक हरविले असल्याची तक्रार पोलिसांत  देत असल्याचं नागरिकांनी सांगितले.