जालना : गुजराच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा कापसाला ५०० रुपये बोनस द्यावा अशी मागणी  राष्ट्रवादीचे माजी मंत्री  राजेश टोपे यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्युत पंपाचं वीजबिल थकल्याने जालना  जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलाय, त्या  पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. त्यानंतर टोपे यांनी  पत्रकारांशी संवाद साधला.


जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जोडलेले विजकनेक्शन तात्काळ जोडा या मागणी बरोबरच गुजरात सरकारने कापसाला ५०० रुपये बोनस देण्याची घोषणा केलीये. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील कापूस उत्पादकाला देखील ५०० रूपये बोनस द्या,अन्यथा सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्यावतीने देण्यात आला आहे.