मुंबई : गेल्या २४ तासात महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) ३ हजार ५८० नवे कोरोनाबाधित (corona affected) आढळले. तर ८९ रुग्णांचा कोरोनामुळे (Covid-19) मृत्यू झाल्याची नोंद झाली. याशिवाय, ३ हजार १७१ जणांनी कोरोनावर (Corona Virus) मात केल्याने त्यांना डिस्चार्जही मिळाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १९ लाख ९ हजार ९५१ झाली आहे. तर, सध्या राज्यात ५४ हजार ८९१ अॅक्टिव्ह केसेस असून, आतापर्यंत कोरोनावर (coronavirus) मात केलेल्या १८ लाख ४ हजार ८७१ जणांना डिस्चार्जही मिळाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा वेग अद्याप नियंत्रणात असून चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण बाधित आढळण्याचे प्रमाण पाच टक्क्यांच्या खालीच आहे. चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याचे प्रमाण आणखी घसरले असून ते १२.७३ टक्के झाले आहे. गुरुवारी ६४३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून १२ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील एकूण बाधितांची संख्या २ लाख ८९ हजारांवर गेली आहे. तर एका दिवसात ७११ रुग्ण बरे झाले. त्यामुळे आतापर्यंत २ लाख ६९ हजार म्हणजेच ९३ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.



दरम्यान, वर्षअखेर आणि नववर्ष स्वागतासाठी होणाऱ्या धिंगाण्याच्या पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यू लावला असताना मास्कशिवाय फिरणाऱ्यांविरोधातही पालिकेने तीव्र कारवाईला सुरुवात केली आहे. एप्रिलपासून सुरु असलेल्या कारवाईत आतापर्यंत ८ लाख २० हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यातून १६ कोटी ७६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. लोणावळ्यात ५ जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. ख्रिसमस, न्यू इअरच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. पर्यटकांची गर्दी होत असल्याने प्रशासनाने निर्णय घेतला आहे.लोणावळ्यात नाईट कर्फ्यूचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत.


नाताळचा सण हे वसईचे खास आकर्षण. यंदा करोनाच्या संकटामुळे वसईकरांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. संभाव्य धोका ओळखून सर्व चर्चनी अनेक निर्बंध घातले आहेत. ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली असली तरी यंदा हा सण अत्यंत साधेपणाने साजरा होईल. वसई-विरार शहरात दरवर्षी नाताळ सण मोठय़ा उत्साहात साजरा होत असतो. करोनाचे सावट नाताळ सणावरही आहे. धोके टाळण्यासाठी चर्चने स्वयंशिस्तीने निर्बंध लावले असून वसईतील ख्रिस्ती बांधवांनी देखील या नियमांचे पालन सुरू केले आहे.