लातूर : उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यासह लातूर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण भरले आहे. या धरणाचे ०६ दरवाजेही उघडण्यात आले होते. लातूरचे भाजप खासदारांनी धरण भरल्यामुळे त्याचे जलपूजन केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता लातूर ग्रामीणचे काँग्रेस आमदार त्र्यंबक भिसे यांनी धरणातील पाण्याचे पूजन केले. भविष्यातही असेच धरण कायम भरून राहावे अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. 


तसेच हे पाणी योग्य नियोजन करूनच शेतकऱ्यांना आणि नागरिकांना पुरवठा करावा अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.