नांदेड : गोदावरी नदीच्या पात्रात बुडून तीन मुलांचा मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना समोर येत आहे. या घटनेनंतर तिघांचेही मुतदेह सापडले आहेत. शुभम जगताप ,शुभम जाधव आणि आनंद केंद्रे अशी मयतांची नावे आहेत. यातील दोघे दहावी आणि एकजण नववीचा विध्यार्थी आहे. पोहण्यासाठी ते गोदावरी नदीत गेले होते.


पोहण्याचा मोह जीवाशी 


गोदावरी पात्राजवळच्या साईबाबा मंदीर पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. तिथे पाणी असल्याने त्यांना पोहण्याचा मोह आवरला नसावा. पण नदीपात्राचा अंदाज न आल्याने ते बुडाले. जीवरक्षकांनी त्यांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.