औरंगाबाद : शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला औरंगाबादमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. क्रांतिचौक भागात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दिवे पेटवत महाराजांचे विचार समाजात रुजवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. दिव्यांच्या लख्ख लख्ख प्रकाशाने क्रांतिचौक उजळून निघाला. जवळपास एक हजार दिवे यावेळी शिवप्रेमींनी पेटवले. यावेळी संपूर्ण परिसर शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला होता.