कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातले पुजारी हटावण्याच्या मागणीसाठी उद्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर बैठक होणार आहे. याच मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. अंबाबाई भक्त मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येनं या बैठकीला उपस्थित होते.


ज्या पद्धतीनं पंढरपुरातून बडव्यांना हटवण्यात आलं, त्याच पद्धतीनं अंबाबाईच्या मंदिरातल्या श्री पुजकांना मंदिराबाहेर काढण्याची मागणी करण्यात येते आहे. पुजाऱ्यांना १५ दिवस मंदिर बंद करावं अशी मागणीही भक्त मंडळांनं केली आहे. महालक्ष्मी देवीच्या मूर्तीच्या पाठीमागे या पुजाऱ्यांनी कोणाचीही परवानगी न घेता एमसील लावलं, तसंच सळ्या घातल्या, असे आरोप करण्यात येत आहेत.