औरंगाबाद : औरंगाबादच्या हल्लाबोल सभेत शरद पवार भाषणाला सुरुवात करताच काही लोकांनी गोंधळ सुरु केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गंगापूरचा कारखाना जयंत पाटलांना देऊ नये तो सहकार तत्वावर चालवावा, अशा घोषणा हे कार्यकर्ते देत होते. 


गंगापूर साखर कारखाना भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या ताब्यात होता. त्यामुळे हा गोंधळ त्यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी केलाय. भाजप कार्यकर्त्यांचे हे वागणं योग्य नाही, अशी टीकाही अजितदादांनी केलीय. 


तर, भाजप असाच गोंधळ घालणार असेल तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ, त्यांच्या सभा होऊ देणार नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले. 


यावर उत्तर देताना प्रशांत बंबसुद्धा आक्रमक झाले. ते काय आमच्या सभा उधळणार पाहून घेऊ, असा इशारा ही बंब यांनी दिला.