जळगाव : भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळाचा तिसऱ्यांदा विस्तार केला. यावेळी भाजपने आयात केलेल्यांना संधी दिली. त्यामुळे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा स्वकीयांवर तोफ डागली. विधानसभा निवडणुकीत आपल्याला तिकीट दिले किंवा नाही दिले त्याची चिंता नाही, असे खडेबोल सुनावले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, एकीकडे काँग्रेसमधून आलेल्या विखे पाटलांना सरकारकडून पायघड्या टाकल्या जातात; आणि चाळीस वर्षे ज्याने पक्षासाठी अथक परिश्रम घेतले त्याच्या बाजूने सरकारकडून 'ब्र' किंवा एक शब्दही कोणी काढला नाही, याची आपल्याला खंत आहे, असे यावेळी खडसे म्हणालेत.


त्याचवेळी भाजपला इशाराही दिला. आपण या अन्यायाविरोधात बोलत राहणार आहे. जनता आपल्या पाठीशी असल्याचे खडसे यावेळी म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर येथे भाजपच्या मेळाव्यात खडसे यांनी सरकारवर निशाणा साधल्याने याचीच जास्त चर्चा सुरु झाली आहे.