पुणे : मरणापेक्षा वाईट मरण गेल्या दोन महिन्यांत अनुभवलंय, अशा शब्दांत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा जाहीर खदखद व्यक्त केली आहे. अशा मंत्रिपदावर लाथ मारतो असं खडसे यांनी म्हटलंय. पुण्याच्या जागर ग्रुपने एका समारंभात खडसे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. 


यावेळी खडसेंनी आपल्या मनातली खंत पुन्हा एकदा जाहीरपणे व्यक्त केलीय. राज्यातील जनतेच्या ताकदीवर आपण तरलो तसंच मुंडे असते तर राज्याचे राजकारण वेगळं असते असंही खडसेंनी म्हटलंय. गेल्या 40 वर्षांत 8 मुख्यमंत्र्यांवर कडक प्रहार केले. मात्र यावेळेचा अनुभव याआधी कधीच आला नव्हता अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केलीय.