धुळे : पक्षासाठी ज्यांनी उभं आयुष्य घालवून सत्ता खेचून आणली, ते आज पक्षाबाहेर आहेत आणि  नारायण राणेंसारखे ‘त्यागी’ नेत्यांना पक्षात स्थान आहे, अशा बोचऱ्या शब्दात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी भाजपवर नाराजी व्यक्त केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळे शहरात ‘आणीबाणी चिंता आणि चिंतनाचा विषय’ या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी एकनाथ खडसेंसोबत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू हेही उपस्थित होते. यावेळी पक्षाबाहेर ठेवल्याची आपल्या मनातील खंत एकनाथ खडसे यांनी श्याम जाजू यांच्यासमोर व्यक्त केली.


ज्यांना आणीबाणीचा काळ माहित असलेले मोजकेच नेते सध्या भाजपात आहेत. त्यामुळे आपली जबाबदारी आता फक्त प्रशिक्षणाची असल्याचा टोला एकनाथ खडसे यांनी स्वपक्षीयांना लगावला.