सरकारची कर्जमाफीची योजना आहे का बँकांसाठी कर्जवसुलीची योजना ? असा प्रश्न माजी मंत्री जयंत पाटील यांनी उपस्थित केलाय. सरकार हे शेतक-यांना दीड लाख रुपये देणार आहे. आणि उरलेले कर्ज शेतक-यांनी भरायचं असं सरकारचं म्हणणं आहे. म्हणजे बँकांच्या सोयीचं धोरण सरकारकडून घेतलं जात आहे असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.