कल्याण : कल्याणजवळ विमानातळासाठी सरकारानं जबरदस्ती जमीन संपादित केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारच्या जमीन संपादनाविरोधात केलेल्या आंदोलनाला आज सकाळी हिंसक वळण लागलं.  


आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झालेत. संतप्त आंदोलकांनी पोलीसांच्या गाड्यांचीही जाळपोळ केली. 


 मालकीच्या जमीनीवर पेरणी करण्यास मज्जाव केल्यानं शेतकऱ्यांचा संताप टोकाला गेल्याचं पुढे येतं आहे.  आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी कल्याण-मलंगड रस्त्यावर टायर जाळून वाहतूकही बंद पाडली.