सिंधुदुर्ग : शेतकऱ्यांनी केलेल्या संपानंतर अर्थराज्य मंत्री आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शेतकऱ्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्जमुक्तीबाबत सरकार गंभीर असल्याचं सांगत कर्जमुक्तीबाबत अर्थसंकल्पातही चर्चा झाली होती असं त्यांनी सांगितलं. तर शेतक-यांनी शेतीमालाचं नुकसान करू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.


दरम्यान, शेतीमालाला हमीभाव आणि संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी शेतकरी १ जूनपासून बेमुदत संपावर गेलाय. राज्य सरकारबरोबरची बोलणी फिस्कटल्याने संपाचे हत्यार उपसले. आज संपाचा दुसरा दिवस आहे. सरकार ठोस निर्णय घेत नसल्याने शेतकऱ्यांनी संपाचा लढा तिव्र करण्याचा इशारा दिलाय. ५ जूनला महाराष्ट्र बंदची हाक दिलेय.


शेतकरी संपाला दोन दिवस होत असतानाही राज्यसरकारने कर्जमाफी बाबत कोणतीच भूमिका न घेतल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी येत्या ५ जून रोजी मुंबई वगळता महाराष्ट बंदची हाक दिली आहे. तर ६ जून रोजी सर्व सरकारी कार्यालयाला टाळे ठोकण्यात येणार असल्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांचे आंदोलन पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.