बेळगाव  : पुणे - बंगळुरू महामार्गावर असणाऱ्या तवंडी घाटातील अमर हॉटेल येथील एका अवघड वळणाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण ठार झालेत. तवंदी घाटात ट्रकने कारला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. 


या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या कारमधील सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार सर्व मृत हे कोल्हापूरमधील मुरगूडचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहेत. या अपघाताची अधिक माहिती मिळालेली नाही. या अपघाताबाबत पोलिसांनी अधिक तपास करीत आहेत.