Ganesh Chaturthi 2024 : संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2024) धूम पाहायला मिळणार आहे. या साऱ्यामध्ये विशेष कौतुक असेल ते म्हणजे (Konkan) कोकणातील गणेशोस्तवाचं. कोकणात कायमच गणेशोत्सवाचं अनोखं रुप पाहायला मिळलं आणि याच उत्सवासाठी मोठ्या संख्येनं चाकरमानी शहरातून गावाकडची वाट धरताना दिसतात. अशा या कोकणाच्या दिशेनं निघणाख्यांचा आणि प्रामुख्यानं रस्ते प्रवास करणाऱ्यांचा मोठा आकडा येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे. इथं प्रमुख समस्या असेल ती म्हणजे वाहतूक कोंडीची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुचाकी किंवा चारचाकीनं प्रवास करणाऱ्या अनेकांपुढंच कोकणात रस्ते मार्गानं प्रवास करत असताना उदभवणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी. पण, मुख्य रस्त्यांचा वापर न करता प्रवासाचा काही टप्पा हा पर्यायी मार्गानं ओलांडण्याचीही सुविधा असल्यामुळं आता ही समस्यासुद्धा फार अडचणी निर्माण करणार नाही हेच खरं. 


गणेशोत्सवाच्या धर्तीवर कोकणात एसटी महामंडळाकडूनही जादा गाड्या सोडण्यात येतात. तर, या ठिकाणी पोहोचण्यासाठी अनेक खासगी वाहनांच्याची लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. (Mumbai to Konkan by road) अशा या कोकणात दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतून निघणाऱ्यांच्या प्रवासाची सुरुवात वेगानं होणार आहे. खासगी वाहन असल्यास ही मंडळी अटल सेतूचा वापर करत मुंबई शहरातील वाहतूक कोंडीतून निसटू शकतात. इतकंच नव्हे, तर फ्री वेच्या माध्यमातूनही प्रवासातील मोठं अंतर कमी करता येऊ शकतं. तिथून पुढं पनवेल - कर्नाळा खिंडीतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबईतूनच निघणाऱ्या जेएनपीटी- चिरनेर मार्गावरून थेट खारपाडा फाट्यावर पोहोचता येऊ शकतं. ज्यामुळं खिंडीतील बहुतांश टप्पा टाळून तुम्ही या ठिकाणी पोहोतू शकता. 


हेसुद्धा वाचा : Mumbai News : लालबागमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी आलेल्यांना बेस्ट बसची धडक; 28 वर्षीय तरुणीचा मृत्यू 


खुद्द कोकणात पोहोचताना मुंबई पुणे एक्स्प्रेसवे सातारा आणि कोयना नगर वरून कळंबोली ते चिपळूण असा प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. प्रत्यक्षात मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास केल्यास हे अंतर 218 किमी इतकं असतं. पण, पर्यायी मार्गाचा वापर केल्यास हेच अंतर 345 किमीवर पोहोचतं. तर, कळंबोली ते रत्नागिरीतील हातखांबा इथपर्यंत दुचाकीस्वारांना मुंबई पुणे एक्स्प्रेसवेनं प्रवास करणाऱ्यांनाही साधारण 100 किमी जास्तीचा प्रवास करावा लागू शकतो. 


मुंबई - गोवा महामार्गानं कोकण गाठताना रत्नागिरी रोखानं प्रवास करायचा झाल्यास मुंबई पुणे एक्सप्रेस वे सातारा, कराड मार्गे कळंबोली ते रत्नागिरी असा प्रवास केल्यास प्रवासाचं अंतर वाढलं पण, वाहतूक कोंडीतून सुटका होते. कोकणासाठीच्या या संपूर्ण प्रवासात लहानमोठे रस्ते आणि उपरस्तेही प्रवास सोपा करणार आहेत. यामध्ये 7.5 किमी अंतराचा कळंबोली पनवेल बायपास रोड, परशुराम घाट, वाकण फाटा इथूनही पर्यायी वाटांनी तुम्ही हा प्रवास करू शकता.