रायगड : छत्री सावरताना तोल जाऊन एका मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रायगडमध्ये घडलीय. विशाखा चाळके असं या 20 वर्षीय मुलीचं नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील चेंबूरहून रायगड जिल्ह्याच्या रसायनी रिस गावात ती आली होती. ती पाताळगंगा नदीपात्राजवळ बसली असताना तिची छत्रे हवेने उडून गेली. 


ती छत्री पकडण्याच्या नादात तोल जाऊन ती नदीपात्रात पडली आणि वाहून गेली. गावक-यांनी तिचा मतृदेह शोधून बाहेर काढला.