मुंबई : हिंगणघाट जळीतकांडातल्या पीडितेच्या मृत्यूनंतर सरकारनं कडक कायदा करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा केल्याची माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिकांनी दिली आहे. तर कठोर कायद्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनीही सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळीतकांडाची घटना घडल्यानंतर राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. घटनेनंतर अनेक ठिकाणी मोर्चे निघाले. अशा घटना घडणार नाहीत. किंवा अशा घटना घडवण्याचं धाडसंच कोणी करणार नाही असा वचक, असे कायदे झाले तर पुन्हा अशी वेळ कोणत्याही पीडितेवर येणार नाही. कारण राज्य, शहरं, मुली बदलतात, पण घटना त्याच त्याच पुन्हा घडतात.


देशात महिलांवरील अत्याचार काही कमी होताना दिसत नाही आहे. प्रेमभंगातून आरोपी विकेश नगराळेने पीडित शिक्षिकेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात पीडिता जवळपास ४० टक्के भाजली होती. मात्र अन्ननलिका, श्वसननलिकाच जळल्यामुळे तिचा जगण्याचा संघर्ष सुरु होता. डॉक्टरांनीही तिला जगवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र तरीही सगळ्यांच्याच प्रयत्नांना अपयश आलं.


३ फेब्रुवारीला ही शिक्षिका कामवर जात असताना आरोपी विकेश नगराळेने भर रस्त्यात पेट्रोल टाकून तिला जाळलं. आपल्या पोटच्या मुलीवर त्या नराधमाच्या कृत्याने ही वेळ आल्याने आधीच बिथरून गेलेल्या आईवडिलांनी आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली आहे.


अशा घटना घडवण्याचं धाडसंच कोणी करणार नाही असा वचक, असे कायदे झाले तरच पुन्हा अशी वेळ कोणत्याही पीडितेवर येणार नाही.